धुळे दर्पण न्यूज :- धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल 1.84 कोटी रुपयांच्या रोकडप्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेली ही रक्कम शिवसेना (शिंदे गट) आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांच्या खोलीत आढळल्याने संपूर्ण प्रकरण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तापले आहे.
विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून ११ संशयितांचे चेहरे समोर आले असून, त्यातील काही शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या संशयामुळे सरकारी यंत्रणेतही खळबळ उडाली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
▪️ रोकडप्रकरणाची पार्श्वभूमी
धुळे दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि त्यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळासह एका खोलीत 1.84 कोटींची बेहिशोबी रक्कम आढळल्याने या प्रकरणाची सुरुवात झाली. ही रक्कम कोणासाठी होती? कोणी आणली? आणि ती कुठे वापरणार होती? – या प्रश्नांची उत्तरं अजूनही धूसर आहेत.
![]() |
- Advertisement - |
▪️ अनिल गोटे यांचा स्टिंग ऑपरेशन आणि आरोप
या प्रकरणात नवा ट्विस्ट आला तो शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे. त्यांनी खोलीत 5 कोटी रुपये असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. एवढंच नव्हे तर, विधिमंडळातील काही आमदारांना पैसे वाटपासाठी 15 कोटी रुपयांचे टारगेट देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.
गोटे यांनी स्वतः विश्रामगृहात ठिय्या देत खोलीला कुलूप लावले आणि तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित यंत्रणांना माहिती दिली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
▪️ ११ संशयितांविषयी तपास सुरु
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वाखाली तपास गतीने सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ११ संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, हे लोक रोकड घेण्यासाठी आले होते की जमा करण्यासाठी – हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातील काही जण सरकारी अधिकारी असल्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे उच्चस्तरीय यंत्रणाही या तपासात ओढल्या जाण्याची शक्यता आहे.
▪️ प्रशासन व राजकारणाला लागलेली झळ
या प्रकरणामुळे राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी दोघेही अडचणीत आले असून, विशेषतः खोतकर यांच्यावरील संशय अजूनही कायम आहे. यामध्ये जर शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, तर हे प्रकरण अधिकच गंभीर रूप घेऊ शकते.
▪️ तपास रोखण्यासाठी मंत्रालयातील लॉबी सक्रीय?
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर एसआयटी (विशेष तपास पथक) नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाची चर्चा थांबवण्यासाठी मंत्रालयातील एका मोठ्या लॉबीने सक्रिय भूमिका घेतली असून, तपासाच्या दिशेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
![]() |
- Advertisement - |
🔻 प्रश्न अनुत्तरितच...
- तब्बल 1.84 कोटी रुपये विश्रामगृहात कसे आले?
- ही रक्कम कोणाची होती?
- ११ संशयित नेमके कोण आहेत?
- शासकीय यंत्रणांमधील कोण अडकेल?
या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी असून, आगामी दिवसांत हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तपासाच्या पुढील हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.